कृषी शेतकरी अवजार बँक

आधुनिक शेती – कमी खर्चात, अधिक उत्पादनासाठी

पिरंगुट ग्रामपंचायतीच्या कृषी अवजार बँकेचा उद्देश शेतकऱ्यांना कमी दरात आधुनिक कृषी अवजारे उपलब्ध करून देणे, शेतीचा खर्च कमी करणे, हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हा आहे.

लाभार्थी पात्रता

पिरंगुट ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी. शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा किंवा शेतीचा पुरावा असणे आवश्यक. ग्रामपंचायतीकडे कोणतीही थकबाकी नसावी (असल्यास प्रथम ती भरणे आवश्यक). शेतकरी गट, बचत गट व कृषी उत्पादक संस्थांनाही लाभ घेता येईल.

अवजार मिळण्याची प्रक्रिया

ग्रामपंचायतीकडे अर्ज करणे आवश्यक. उपलब्धतेनुसार अवजारांचे वाटप "प्रथम अर्ज – प्रथम प्राधान्य" तत्त्वावर होईल. अवजार घेताना नोंदवहीत सही करणे बंधनकारक राहील. निश्चित कालावधीत अवजार परत करणे आवश्यक राहील.

शेतकऱ्यांची जबाबदारी

अवजारांचा योग्य व सुरक्षित वापर करणे. अवजार खराब झाल्यास तत्काळ ग्रामपंचायतीला माहिती देणे. जाणीवपूर्वक नुकसान झाल्यास दुरुस्तीचा खर्च संबंधित लाभार्थ्याने भरावा. अवजार इतर व्यक्तीला परवानगीशिवाय देऊ नयेत.

हवामान बदल व कृषी अवजारांचा वापर

आज वाढते तापमान, अनियमित पाऊस, दुष्काळ व हवामान बदलामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी अवजार बँकेतील साधनांचा वापर करून शेतकरी आधुनिक व हवामान-स्मार्ट शेती करू शकतात.